Tuesday, December 9, 2008

अश्रू

कोणीच नसतं आपल्याला दुःखातून बाहेर काढणारं ,
कठीण प्रसंगाच्या काळात मदतीचा हात पुढे करणारं ...

आपली जवळची माणसंच परक्यासारखी वागू लागतात ,
आपल्याकडेच सच्चेपणाचे पुरावे मागू लागतात ...

शेवटी नशीबाचे भोग आपल्यालाच भोगावे लागतात ,
पदोपदी असंख्य यातना, अपमान झेलावे लागतात ...

तरीही लोकांसमोर मात्र हे दुःख दाखवायचं नसतं ,
हसत हसत आपल्या अश्रूंना नकळत लपवायचं असतं !!!


--- स्वाती ०७.१२.२००८

No comments:

Post a Comment