कोणीच नसतं आपल्याला दुःखातून बाहेर काढणारं ,
कठीण प्रसंगाच्या काळात मदतीचा हात पुढे करणारं ...
आपली जवळची माणसंच परक्यासारखी वागू लागतात ,
आपल्याकडेच सच्चेपणाचे पुरावे मागू लागतात ...
शेवटी नशीबाचे भोग आपल्यालाच भोगावे लागतात ,
पदोपदी असंख्य यातना, अपमान झेलावे लागतात ...
तरीही लोकांसमोर मात्र हे दुःख दाखवायचं नसतं ,
हसत हसत आपल्या अश्रूंना नकळत लपवायचं असतं !!!
--- स्वाती ०७.१२.२००८
Tuesday, December 9, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment