का कधी कधी जवळचीच माणसं इतकी कठोरपणे वागतात ?
सुखाची फ़ुले पसरवली कितीही आपण त्यांच्या वाटेवर ...
तरी ते मात्र आपल्याला, दुःखाच्या काट्यांवर चालायला लावतात !
हसवत ठेवले जरी आपण नेहमी त्यांना ...
तरी ते मात्र नेहमी आपल्या डोळ्यांना अश्रूच देतात !
सोबत केली त्यांच्या गरजेच्या वेळी आपण ...
तरी ते मात्र आपल्याला एकटं सोडून निघून जातात !
आपण त्यांच्या आठवणीत रात्रंदिवस झुरलो तरीही ...
ते मात्र आपल्याला विसरून सुखाने जगतात !
का कधी कधी जवळचीच माणसं इतकी कठोरपणे वागतात ?
Thursday, October 23, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
खुप त्रास होतो मला
ReplyDeleteजिव कासाविस होवून जातो
ओलखिचा कुणी समोरून
ओलख न दाखवता निघून जातो