Thursday, October 23, 2008

कधी कधी

का कधी कधी जवळचीच माणसं इतकी कठोरपणे वागतात ?

सुखाची फ़ुले पसरवली कितीही आपण त्यांच्या वाटेवर ...
तरी ते मात्र आपल्याला, दुःखाच्या काट्यांवर चालायला लावतात !

हसवत ठेवले जरी आपण नेहमी त्यांना ...
तरी ते मात्र नेहमी आपल्या डोळ्यांना अश्रूच देतात !

सोबत केली त्यांच्या गरजेच्या वेळी आपण ...
तरी ते मात्र आपल्याला एकटं सोडून निघून जातात !

आपण त्यांच्या आठवणीत रात्रंदिवस झुरलो तरीही ...
ते मात्र आपल्याला विसरून सुखाने जगतात !

का कधी कधी जवळचीच माणसं इतकी कठोरपणे वागतात ?

1 comment:

  1. खुप त्रास होतो मला
    जिव कासाविस होवून जातो
    ओलखिचा कुणी समोरून
    ओलख न दाखवता निघून जातो

    ReplyDelete